February 11, 2011

इतिहास ही जेत्यांची कथा असते. कदाचित ते सत्य असेलच असे नाही. राम युद्ध जिंकला म्हणून तो पुरुषोत्तम आणि रावण हरला म्हणून तो राक्षस असाच इतिहास आपण शिकतो आणि आपल्याला शिकायला आवडते सुद्धा.

महाभारत वाचताना ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते. युद्धात कौरवांचा एकही सेनापति युद्धानियमानी न मारणारे पांडव जेते होते. योग्य अयोग्य अशा व्याख्या या निकालावर अवलंबून असतात.

इतिहास प्रमाण मानून योग्यतेचे निष्कर्ष लावणे कितपत बरोबर आहे ?

No comments:

Post a Comment